Suhas

Suhas Raut

मी सुहास काशिनाथ राऊत,वयाच्या पासष्टीत आहे.वरोर,तालुका—डहाणु,जिल्हा—पालघर हे माझं गांव.वडील कै.श्री काशिनाथ केशव राऊत हे वरोरच्या वाडीआळीतील तर आई कै.सौ.शशिकला (पुर्वश्रमीची मनु पांडुरंग पाटील) ही पण वरोरच्याच पाटील आळीतील.०८ आक्टोबर १९५३ ला वरोरला आजोळी माझा जन्म झाला.आम्ही ३ भाऊ,३ बहिणी.माझा नंबर तिसरा.त्या वेळी "हम दो!हमारे दो!"चा नारा नव्हता.नाहीतर माझा तिसरा नंबर लागलाच नसता. वडील राज्य पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक,नोकरीच्या अखेरच्या कालखंडात शिक्षण विस्तार अधिकारी होऊन सेवानिवृत्त झाले.आई गृहीणी.वडीलांना समाजसेवेचीही आवड होती.आम्ही सोमवंशी पाठारे क्षत्रिय ( वाडवळ) समाजातले.सदर समाजाचे अध्यक्षपदही वडीलांनी भुषविले.वडील अभ्यासात हुशार होते.पुर्वीच्या फायनल ( ईयत्ता ७ वीच्या) परीक्षेत ते ठाणे जिल्ह्यात प्रथम आले होते,तर प्राथमिक शिक्षकांच्या पी.टी.सी.(आताच्या डी.एड.समकक्ष) परीक्षेत ते महाराष्ट्रात प्रथम आले होते.त्यांना लेखनाची आवड होती.त्यांच्या २५० कथा,कविता,लेख,२५ नियतकालिकांतुन प्रसिध्द झालेल्या आहेत. मला लेखनाचा वारसा त्यांच्या कडुनच लाभला.वडीलांच्या नोकरी निमित्त आम्ही वरोर,निर्मळ,सातपाटी,तलासरी,बोर्डी,चिंचणी येथे राहिलो. माझे प्राथमिक शिक्षण वरोर व तलासरीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत,तर माध्यमिक शिक्षण ठक्करबाप्पा हायस्कुल,तलासरी व के.डी.हायस्कुल,चिंचणी येथे झाले.खासदार कै.श्री चिंतामण वनगा हे माझे वर्गमित्र,आम्ही तलासरीला ईयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंत एका वर्गात शिकलो.एफ.वाय. व इंटर आर्टसला मी मुंबईच्या पार्ले काॅलेजला होतो. परिस्थितीवश नोकरी करणे भाग पडल्याने मी एप्रिल १९७४ ला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात मिळालेली निम्नस्तर लिपिकाची पहिलीच नोकरी पकडली.पुढील शिक्षण बाहेरुन करण्यासाठी पुणे विद्यापीठ तसेच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठात प्रवेश घेतला पण संसार व नोकरी या मुळे बी.ए.होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. पेण,डहाणु,तलासरी,पालघर,बोईसर,वसई येथे ३७ वर्षे नोकरी करुन आॅक्टोबर २०११ ला ऊच्चस्तर लिपिक पदावरून सेवा निवृत्त झालो.सेवानिवृत्ती नंतरही ५ वर्षे जानेवारी २०१६ पर्यंत विद्युत मंडळात बाह्यश्रोत पध्दतीने काम करीत राहिलो.जुलै २०१६ पासुन एका सुरक्षा एजन्सीत काम करीत आहे.सध्या डहाणु पुर्वेला कॅनरा बॅंकेत आहे. वयाच्या बावीसाव्या वर्षी १४ आॅक्टोबर १९७५ ला नरपड, (दक्षिण आळी)तालुका—डहाणु,जिल्हा—पालघर येथील कु.कल्पना अरूण पाटील,त्या वेळचे वय वर्षे १६ हिच्याशी प्रेमविवाह झाला.एक मुलगा वय वर्षे ४१ व एक मुलगी वय वर्षे ३८ आहेत.दोघां कडुन वय वर्षे १३ व वय वर्षे ३ चे नातु आहेत. २५ वर्षे वाणगांवला वास्तव्य होते ११ वर्षांपासुन डहाणुला वास्तव्य आहे. वयाच्या १८ व्या वर्षी माझी पहिली कथा प्रसिध्द झाली.आज पर्यंत २५ नियतकालिकांतुन १०० च्या वर कथा,कविता,लेख व स्फुट लेखन प्रसिध्द झाले आहे. वाॅटसअप व फेसबुकवरही मराठी व बोलीभाषा वाडवळीत लेखन करतो.दिनांक २८ जानेवारी २०१८ ला सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजोन्नती संघ ट्रस्ट फंडाचा "सौ.जया लीलाधर चौधरी—पुरस्कृत लेखक/ कवी प्रोत्साहनपर गुणवंत गौरव पुरस्कार"मिळाला आहे. —सुहास काशिनाथ राऊत/ वरोरकर,डहाणु,09923004895.

मायी वाडवळी कविता:—"कोपभर शा,त्यात टिबाभर दुद !"

1749

"मायी वाडवळी कविता."

   "कोपभर शा,त्यात टिबाभर दुद !"

कोपभर शा,
त्यात टिबाभर दुद !
करुन देव्याही माला भोठीबाय,
मानत अहे माला तिया पुत !

जकले हांगव्याये 'भोठ्याबाबा',
काका आमसा भोठा !
पदवी ही नुसती नावा पुरतीस,
जकला जनम गेला खोटा !

वाडीवाळे आमी वाडीकर,
रेलते फक्त नांवाला !
साऊळ पावसाळी पिकवत होते,
बिजा देवावरस हवाला !
 
तिनव्या पोर्‍यास,पोरान पोटी,
जनम नय घेतला !
पण हयात गेली फुकट अहा,
ध्यास नय त्यायीन घेतला !

भोठीबाय गोरी,ऊश्शी,
नाकिडोळी निटस !
जवानीत ते दिखत अहेन,
जकल्या जणीत ती सरस !

भोठ्याबाबा सांब सदाशिव,
निष्कपट न भोळा !
पदरी पडला पवित्र झाला,
लावला तिन लळा !

माई,आशा,उषा या,
तिन त्यांशा पोर्‍या !
गरीबी अवडी घरा दारा,
विणल्या हुंबाया दोर्‍या !

भोठ्याबाबा रानात जाई,
नोकरी त्यायी जंगल कुपात !
भोठीबाय एखली कही,
रेलेन मंग वरोरा सुखात ?

माणकु,मालती,मनु या,
तिन तिया देराण्या !
भावलाणी अहुन नय केल्या तिनं,
कोणशा कव्वास कहाण्या !

मुकुंद,मोरेश्वर,काशिनाथ,
होते तिन तिये देर !
कव्वास मानलं नय नातं ये,
हमजली ती आपली पोरं !

माई भोटी,उषा लानी,
मनशी आशा ठरली वेडी !
एक टक पावुन हाअत रेव्यायी,
नय काढली कोणशी खोडी !

माई परणली भोट्या घरा,
उषाला लागली हळद !
पण आशा गायब झाली,
कोणालास नकळत !

दु:ख झाले बिज्यांनाव पण,
दोगंस रेले कुढत !
आयुष्यायी गाणी गायली,
त्यांयीन रडत रडत !

दाजी,भोठ्याबाबा गेला,
देवकुराणी रेली एकाकी !
एखलीस मंग रेव्या लागली,
आमशी भोठी ही काकी !

हक्काळशी उठुन हालं,हाळकुंडा,
बहत रेव्याय ती कुटत !
कोण काय बोलते आयकव्या नय ती,
फुकाय आयुष्य होतं वाटत !

लोकांयं जवा रांदण हिजव्या,
यीही हावळी जात सुलीत !
पंस पकवानं होडुन दिलती,
जेवण जेव्यायी मुळमुळीत !

दोन वहरं मी वरोरला हिकव्या,
होतो दहावी,अकरावीत !
घरशे जकले दुर होते,सुलत भाहास,
भाहा न होते माया मनाये मित !

पाना तवा फुटला काकीला,
पावला तिनं मायात पोर !
हाअत होती पावुन मायातटे,
हलका करव्यायी जिवाया घोर !

रोज हक्काळशी हावळी,भोंगेरी,
सुलीत तिया पेटत !
कोंदट,कुडाया,धुरकट घरात,
आयुष्य होती ती रेटत !

रोज हक्काळी रामाया पारी,
हाक तियी येव्यायी !
"सुहास,ये रं माया पोरा, 
वेळ झाली शा पेव्यायी !"

जळकट टोप,कळकट कोप,
त्यात शा ती ओतव्यायी!
अधीरता अहे तिया मनात,
बशी माया ओठाला टेकव्यायी !

नव्हता नुसता शा,अमृत ते होते,
त्यात भुकीस नय,टाकव्यायी ती प्रेम जिव्हाळा !
एक कोप शा वरतीस वाढला,
जकली माया,जकला लळा !

दिही उलटले,मयने,वहरं गेली,
अंतिम घडी ती आली !
दीन बिचारी भोठीबाय,
जकल्याना होडुन गेली !

आज त्यांशा घठाणावर,
नाही दिवा पेटत !
खंत कोणाला वाटे नय पण,
मला नय ये पटत !

कोपभर अहव्या शा, त्यात तवा, 
पडव्याय टिबाभर दुद !
भोठीबाय होती 'आय' मायी,
न मी होता तवा तिया पुत !

                :समाप्त:

कवि:—
सुहास काशिनाथ राऊत/ वरोरकर.
सी—१०,रामजी पार्क सोसायटी,
डहाणु रोड (पुर्व),पिन—४०१ ६०२.
मोबाईल/वाॅटसअप—९९२३००४८९५.

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

4 + 4=    get new code
Post Comment